ब्राह्मण सभागृहात डिजिटल सुरक्षेचा संदेश; सायबर वॉरियर्सचा नागरिकांशी थेट संवाद
जळगाव : सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सजग राहणे आवश्यक असल्याचा संदेश ब्राह्मण सभागृह येथे आयोजित सायबर सिक्युरिटी इम्पॅक्ट सेशनमधून देण्यात आला.
सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत सायबर सिक्युरिटीची माहिती दिली. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि ऑनलाइन बँकिंगचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला कार्यालय सचिव गणेश भगवान माळी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम डॉ. आर. बी. आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
सायबर सुरक्षेसाठी उपयुक्त असलेल्या Quick Heal Foundation च्या Anti Fraud App ची माहिती देण्यात आली. नागरिकांना ॲप डाउनलोड करून त्याचा उपयोग समजावून सांगण्यात आला.
Comments
Post a Comment