निष्काळजी वाहनचालकांचा खपवून घेतला जाणार नाही; चाळीसगाव महामार्ग पोलिसांचा कडक इशारा..!


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
9096237788
चाळीसगाव प्रतिनिधी:
महामार्ग पोलिस केंद्र, चाळीसगाव जि. जळगाव यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ अंतर्गत वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. वाढते अपघात, मानवी निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेता, सुरक्षित वाहनचालना ही काळाची गरज बनली आहे.
महामार्ग, मार्ग व शहरांतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाने नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. पादचाऱ्यांचा सन्मान राखणे, वेगमर्यादेचे पालन करणे, अनावश्यक हॉर्न टाळणे, लेन शिस्त पाळणे व सुरक्षित अंतर ठेवणे यामुळेच अपघात टाळता येऊ शकतात.
विशेषतः मद्यपान करून वाहन चालवणे, मोबाईलचा वापर, हेल्मेट व सीटबेल्टकडे दुर्लक्ष, ओव्हरटेकिंगमधील घाई ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. वाहनचालकांनी वाहतूक सिग्नल, पोलिसांचे निर्देश आणि नियमांचे पालन केल्यास अनेक कुटुंबांचे आयुष्य सुरक्षित राहू शकते.
घरातून कोणीही वाट पाहत असते, ही जाणीव ठेवून वाहन चालवणे हाच या अभियानाचा मुख्य संदेश आहे. नियम पाळा, संयम ठेवा आणि सुरक्षित प्रवास करा—हीच खरी जबाबदारी.
सुरक्षित रस्ता, सुरक्षित जीवन — हाच संकल्प!

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद